Skip to main content

फटका गँगसमोर मध्य रेल्वे दुर्बळ!



लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाइल किंवा पर्स लंपास करणाऱ्या फटका गँगसमोर मध्य रेल्वे यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे.गेल्या पाच दिवसांत अशा दहा घटनांमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवाशांवर हल्ले करण्यात आले. एकटय़ा जीटीबी नगर स्थानक परिसरातच पाच गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.
लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाइलवर बोलतात. काहींच्या बॅगा खांद्याला अडकवलेल्या असतात. हीच संधी रुळांलगत दबा धरून बसलेले चोर साधतात. रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांच्या जवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले लोखंडी किंवा लाकडी वस्तूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. फटका गँग म्हणून कुख्यात असलेल्या या चोरांविरोधात जानेवारी ते ऑगस्ट २०१९ पर्यंत २८१ पेक्षा जास्त गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. वडाळा हद्दीत सर्वाधिक ५२ घटना घडल्या असून वडाळा ते जीटीबी नगरदरम्यान २५ आणि किंग्ज सर्कल ते वडाळादरम्यान  १२ घटनांची नोंद आहे.
या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्वतंत्र कर्मचारी रुळांजवळ तैनात केले; परंतु त्यानंतरही या गुन्ह्य़ांना आळा बसलेला नाही. गेल्या सहा दिवसांत फटका गँगविरोधात एकूण दहा गुन्ह्य़ांची नोंद झाली असून एकटय़ा जीटीबी स्थानकाजवळच पाच गुन्हे घडले आहेत. यामध्ये ४ ऑक्टोबरला जीटीबी स्थानकाजवळच झालेल्या सलग तीन गुन्ह्य़ांची नोंद वडाळा लोहमार्ग पोलिसांकडे झाली. जीटीबी नगर स्थानकातून सुटलेली लोकल लकी पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळून जाताच रुळाजवळ उभे असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारून मोबाइल चोरीला नेल्याच्या घटना घडत आहेत, तर कुर्ला, कल्याण लोहमार्ग हद्दीतही अशा गुन्ह्य़ांची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली आहे.

Comments

Popular Posts

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.