Skip to main content

फॅन्सी नंबरप्लेटला करा बाय; जाऊ शकतो परवाना


तुमच्या दुचाकीची किंवा कारची नंबरप्लेट फॅन्सी प्रकारातील असेल, तर सावधान.... तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्व विभागीय आरटीओ कार्यालयांना तशा सूचना दिल्या आहेत. अशा फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकी किंवा कार या अगोदर सापडल्या असतील, आणि त्यांना सूचना देऊनही त्या व्यक्ती नंबर न बदलतात तशाच दुचाकी किंवा कार चालवताना आढलल्या तर त्यांचे परवाने रद्द करून टाकावेत अशी स्पष्ट सूचना वाहतूक विभागाने आरटीओंना दिल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्ट अशा ८ महिन्यांच्या कालावधीत फॅन्सी नंबरप्लेट धारण करणाऱ्या २२७२ व्यक्तींना चलान पाठवण्यात आले होते. हे नंबरप्लेट देवनागरी आणि फॅन्सी पद्धतीने टाकण्यात आले होते. या सर्वांना टेक्ट मेसेज पाठवून वाहतूक पोलिसांनी अशा नंबरप्लेट बदलण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या २२७२ पैकी ११ जण अशा नंबरप्लेटसह दुसऱ्यांदा आढळून आले असल्याचे मुंबई वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. अशा दुसऱ्यांदा पकडण्यात आलेल्या लोकांचे परवाने रद्द करण्याविषयीच्या सूचना आम्ही आरटीओ कार्यालयांना दिल्या असल्याची माहिती पांडे यांनी दिली. हे अकरा जण दुचाकीस्वार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

फॅन्सी नबरप्लेट वापरल्यास वाहनधारकाला १००० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. विशेष म्हणजे राजकीय नेते, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते अशांचा ओढा अशा फॅन्सी नंबरप्लेट वापराकडे अधिक असल्याचे आढळून आले आहे. 'दादा' आणि 'बाबा' अशा प्रकारातील नंबरप्लेट अधिक प्रमाणात आढळून येत आहेत सन २०१८ मध्ये एकूण ९०३७ दुचाकीस्वारांचे परवाने रद्द करण्याच आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते त्रिवणकुमार कर्नानी यांनी दिलीय.

सर्व भाषिक लोकांच्या चटकन लक्षात यावेत यासाठी गाड्यांवरील नंबरप्लेट या इंग्रजीमध्ये असतात. बाहेरील राज्यातून एखादी गाडी आपल्या राज्यात आली आणि ती व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सहभागी असेल, तर इतर भाषेत असलेली नंबरप्लेट वाचताना अडचण येऊ शकते असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.

Comments

Popular Posts

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.