Skip to main content

सलमान खानच्या केअर टेकरला अटक, जबरी चोरी करुन 29 वर्ष पोलिसांना देत होता गुंगारा




मागील 29 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका भामट्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा भामटा अभिनेता सलमान खानच्या गोराई बीच येथील फार्महाऊस मध्ये आपली ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. अखेर पोलिसांनी त्याचा भांडाफोड करत त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव शक्ती सिद्देश्वर राणा आहे.

आरोपीने 1990 मध्ये आपल्या साथीदारांसह एका व्यक्तीच्या घरात घुसून जबरी चोरी करत मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. कालांतराने तो जमिनीनावर मुक्त झाला होता. परंतु या नंतर मात्र तो न्यायालयात नियमितपणे हजर न राहता आपली ओळख लपवून गोराई बीच येथील सलमानच्या फार्महाऊसमध्ये 15 वर्षांपासून राहत होता. सलमानच्या बंगल्यावर गेल्या 15 वर्षांपासून शक्ती हा केअर टेकर म्हणून काम करीत होता. सध्या शक्ती याचे वय 62 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी शक्ती आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मिळाला होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर शक्ती फरार झाला तो कधीच न्यायालयात सुनावणीसाठी आला नाही.

त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, पोलिसांकडील पत्त्यावर तो सापडला नाही. पोलिसांनी खबरे, तांत्रिक पुरावे या आधारे शक्ती गोराई परिसरात राहात असल्याचे समजले. गुन्हे शाखेच्या पथकाने गोराईचा परिसर पिंजून काढला त्यावेळी येथील एका बंगल्यात तो सापडला. चौकशीमध्ये हा बंगला सलमान खान याचा असल्याचे स्पष्ट झाले.

Comments

Popular Posts

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.